Showing posts with label गीत रामायण. Show all posts
Showing posts with label गीत रामायण. Show all posts

Sunday, November 17, 2013

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा !


डी एस के यांच्या कृपेने आज "गीतरामायण" हा श्रीधर फडके यांचा कार्यक्रम अनुभवण्याचा योग आला ! हा उत्तुंग आविष्कार आणी त्याच बरोबर धनश्री लेले या विदुषी चं निरुपण ऐकून धन्य झाल्या सारखं वाटलं !

गदिमा ह्या महा-कविराजा चे पाय धरायला मला ह्या आयुष्यात मिळाले नाहीत याची चणचण लागून गेली !
फक्त ह्या एका गाण्यातल्या पहिल्या आठ अंतर्यात गदिमांनी जीवनाची सर्व "फिलोसॉफी" सांगून टाकली आहे !
ह्या गाण्या बद्दल चा अजून एक आश्चर्यकारक किस्सा म्हणजे .. बाबुजींनी (सुधीर फडके ) ह्या गाण्याला चाल हि रेडियो वर "लाइव" गाता-गाता .. सकाळी ८.४० ते ९ च्या दरम्यान लावली !

गदिमा आणी सुधीर फडके या जोडीला साष्टांग नमस्कार ! 

श्रीरंग भावे  च्या स्वरात पराधीन आहे जगती


खुद्द बाबूजींच्या स्वरात .. पराधीन


श्रीधर फडके यांच्या स्वरात - पराधीन 



----------------------

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा  !

----------------------


दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?

वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ

पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा  !