Monday, March 2, 2026

Agryahun Sutka - A book written after scientific research by Dr Ajit Joshi ( आग्र्याहून सुटका )


  शिवाजी  महाराजांनी  "मिठाई च्या पेटऱ्यातून लपून पलायन केले" ही गोष्ट कधीच पटली नव्हती, खरी वाटत नव्हती..इतिहासकारांनी ही गोष्ट पसरवलेली आहे हे समजत होते, बहुतेक ते अपुऱ्या संशोधना मुळे आणि अन्य काही राजनैतिक करणां मुळे असावे .. असो !

"आग्र्याहून सुटका" हे डॉ अजित जोशी यांचे पुस्तक वाचले आणि त्यांनी मांडलेल्या तर्कशुद्ध संशोधना मुळे इतिहासा चे हे कोडे सुटले आणि महाराजांच्या व त्यांच्या गुप्तहेर खात्या च्या कर्तुत्वा बद्दल विश्वास अधिक दृढ झाला. 

पुस्तकात मांडलेले काही महत्वाचे मुद्दे : 

शिवाजी महाराज वेषांतर करून सर्वांना समजायच्या आधी जवळ-जवळ २५ दिवसांपूर्वी निसटले होते व स्वराज्यात पोहोचल्या नंतर "मिठाई च्या पेट्या" ची गोष्ट (अफवा) पसरवली गेली ..अशा अनेक अफवा ही पसरवण्याचे काम जाणीवपूर्ण करण्यात आले होते. 

महाराजांच्या हेर खात्यानी कित्येक महिन्यां आधी परतण्या चे मार्ग आखून ठेवले होते 

- कवींद्र परमानंद यांचे  महत्वपूर्ण योगदान ( गुप्त हेर ) 

- निराजी रावजी व त्यांचे पुत्र (संभाजी महाराजांचे समवयस्क ) 

- हिरोजी फर्जन्द ( महाराजांचे सावत्र भाऊ , महाराजां सारखेच दिसायचे ) 

-  १८ ऑगस्ट ला मुघलांना समजलं असलं तरी प्रत्यक्षात महाराज २२ जुलै लाच निसटले 

- "पेटऱ्यातून निसटले असतील" हा एक तर्क फक्त मुघल दरबारातील अधिकाऱ्यांनी स्वतः चं कातडं वाचवण्या साठी औरंगजेबा समोर मांडलेला आहे 

- गुटका खाऊन अदृश्य झाले, उडून गेले, असे अनेक तर्क  दरबारी अधिकाऱ्यांनी मांडलेले होते 

- नरवर घाटातील २८ जुलै ची नोंद महत्वाची  

-------------------

"Aagryahun Sutka" is an excellent factual book based on Scientific research backed by evidence. It proves with factual and logical evidence the way Shivaji Maharaj escaped from Agra in 1666

A "Must Read" for all History buffs and people who believe in evidence based, unbiased research of history backed by logic and analyzed with Scientific mind.

Thanks to Dr Ajit Joshi for excellent work!

आग्र्याहून सुटका - Agryahun Sutka is available on Amazon, Flipkart and many other platforms selling books. Facebook page of the book:  Facebook

Here are some links from YouTube with detailed presentation, analysis, Q&A session 


Interview of Dr Ajit Joshi about "Agryahun Sutka" (2023)



A virtual meet by Dr Ajit Joshi and his presentation on "Agryahun Sutka" with detailed question and answers 


-------------------

Dr Ajit Joshi is a chemical technologist and renowned historical researcher best known for his critically acclaimed book, "Agryahun Sutka" (Escape from Agra). 

The Book: Originally published in 1997 (with a second edition in 2016), the book provides an authentic reconstruction of Chhatrapati Shivaji Maharaj's historic escape from Mughal Emperor Aurangzeb's captivity in Agra in 1666 AD.

Research & Methodology: Dr Joshi dedicated three years to research, citing over 103 references and using original historical documents to challenge popular myths.

New Theory: He famously argues that the traditional story of escaping in sweet baskets is historically questionable, instead presenting a theory based on logical analysis of horse speeds, communication systems, and travel lodges (sarais) of that era.

Recognition: For this extensive research, he was awarded a D. Lit. in Historical Research and received multiple literary awards. 

About Dr Ajit Joshi

Professional Background: Beyond history, he is a chemical professional with expertise in specialty chemicals, exports, and product development.

Other Works: He has also authored "Chitpavan Kokanastha Brahmins: Surnames and Gotras".

Publisher: His historical works are typically published through Shivapratap Prakashan. 

-------------------------

Saturday, November 8, 2025

Pulotsav - पुलदैवता चा पुलोत्सव


 पुलदैवता चा पुलोत्सव तर मराठी मनात जवळ जवळ रोजच अनुभवतो .. पण आजचा दिवस विशेष आहे.  

 ८ नोव्हेंबर - पुलदैवत जयंती !

दररोज पुलं चं  एक तरी वाक्य कुठल्या न कुठल्या प्रसंगा वरून आठवतं .. व्यक्ती आणि वल्ली तर अजून हि भेटतात! त्यांचा आवाज "हरितात्या", "राव साहेबां" सारखाच ऐकू येतो..सतत मराठी मना मध्ये घुमत रहातो!

मी मराठी साहित्या कडे मनापासुन वळलो ते बहुतेक पुलं च्या कथाकथना च्या कॅसेटस्  मुळे ..आपल्याला जे आसपास दिसतंय ते हा माणूस बरोब्बर शब्दात मांडतोय हे अगदी सामान्य वाचका च्या लक्षात येतं ..त्यामुळे एक प्रकारचा संवाद लवकर साधला जातो ..त्याच्या प्रतिकात्मक,रुपात्मक, तुलनात्मक  शैलीत लिहिण्याची लकब हि जवळीक निर्माण करणारी होती 

त्यांना "मध्यम वर्गीयांचा " लेखक असं म्हणायचे तेच बरोबर. मध्यमवर्गीय आवडी-निवडीं ची नस त्यांनी त्यांच्या लेखनात पकडलेली दिसते .. म्हणूनच ६०-७०-८० च्या दशकात तेव्हाचा  पुणे-मुंबई तील मध्यम वर्गीय हा त्यांचा "core" वाचक वर्ग होता. आज सुद्धा पुलं च्या साहित्य-कथा कथनाचा स्पर्श झाला कि मराठी तरुण, परत मराठी साहित्य -पुस्तकं वाचण्या कडे आकर्षित होत आहेत !

पुलं च्या जयंती निमित्त आज काही  निवडक आणि मनात विशेष घर करून बसलेली व्यक्ति चित्र आणि उतारे :

निवडक अंतू बरवा

रत्नागिरीच्या त्या मधल्या आळी मध्ये लोकोत्तर पुरुष राहतात. देवानी माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्या मध्ये रत्नागिरीच्या लाल चिर्याचे ,नारळा फणसाचे ,खाजर्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणार्या ओल्या  सुपारीचे गुण अगदी एकवटून भरलेत . 

अंतू बरवा हा ह्याच मातीत उगवला आणि पिकला.

जीवनाच्या कुठल्या तत्व ज्ञानाच्या अर्क हि मंडळी प्यायली आहेत .. देव  जाणे .. त्यातली निम्म्या हून अधिक माणसं मनी ओर्डर वर जगतात .. आणि त्यातले पैसे  वाचवून दावे लावतात..प्रत्येकाची तारीख पडलेली ..

विशाल सागर तीर आहे .. नारळीची बन आहेत  पोफळी च्या बागा आहेत ... सार काही आहे .... पण ...त्या  उदात्ततेला दारिद्र्य असं छेद देवून जांत आणि मग उरत काय ?   एक भयाण  विनोदाच  अभेद्य असं कवच !

कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील --- खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात !

-------------------------------------------------------------------------------------------------

निवडक रावसाहेब

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्लेन्ग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये .. ह्याला काही उत्तर नाही. पंधरा- पंधरा वीस- वीस वर्षाच्या परिचयाची माणसं असतात .. पण शिष्टाचाराची घडी थोडीशी  मोडण्या    पलीकडे  त्यांचा आणि आपला कधी संबंधच जात नाही .. त्यांच्या घरी जाणं होतं , भेटणं बोलणं होतं , पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत.

आणि काही माणसं ... आगदी क्षणभरात जन्म जन्मांतरीच नातं  असल्या सारखा दुवाद साधून जातात... वागण्यातला बेत शुद्ध पणा अगदी क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही , पूर्व संस्कार , भाषा , चवी, आवडी निवडी .. कशाचाही आधार लागत नाही ... सुत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात !

बेळगावच्या कृष्णराव  हरिहरांची अशीच गाठ पडली .. त्यांना सर्व लोक रावसाहेब म्हणायचे ... 

हि रावसाहेबी त्याना सरकार नी बहाल केली नव्हती .. जन्माला येतानाच ते  ती घेवून आले होते .. शेवट पर्यंत ती सुटली नाही !     

काही माणसांची वागण्याची तर्हाच अशी असते कि त्यांच्या हाती मद्याचा पेला देखील फुलतो आणि काही माणसं दुध देखील ताडी प्यायल्या सारखे पितात ..

रावसाहेब शौकीन होते पण वखवखलेले नव्हते ..जीवानात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले .... पण उपाशी वाघ हा  काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्या च्या वळणावर न्हेईल ?

------------------------------------------------------------------------------------------

निवडक हरितात्या

हरितात्या आम्हाला शिवाजी, तानाजी , समर्थ ,तुकाराम वैगरे मंडळींना हे असे भेटवून आणायचे ...

वर्गातला इतिहास मला कधी आवडला नाही आणि कळला हि नाही ...त्यात सन होती .. हरीतात्यांचा  इतिहास सणांच्या गणितात गुंतला नव्हता .. तो हरीतात्यान   इतकाच जिवंत होता...

हरीतात्यांनी इतिहास हा भूतकाल वाचक क्रीयापादानी दूर न्हेलेला नव्हता .. असं वाटायच कि नुकतेच भेटून आलेत छत्रपतींना.. आज लक्ष्यात येतं ... त्यांचा त्या गोष्टीतला मी म्हणजेच ती इतिहास नावाची अज्ञात व्यक्ती !

प्रत्येक  प्रसंगी हरितात्या त्या तिथे कसे हजर  होते हा विचार लहानपणी आमच्या डोक्यात कधी  शिरला नाही आणि मोठे पणी आम्ही त्यांना त्या जागृत समाधी तून कधी बाहेर काढलं नाही

माझं बालपण इतिहास जमा झालं ... घरातली करती माणसं हि दृष्ट लागून जावी तशी गेली ....आजोबा आज्जी गेली ... वडील गेले .. घरचे नात्या गोत्यातले लोकही आता परके झाले आहेत ... हरीतात्या कुठे गेले कोण चौकशी करतोय ..

पण कधी कधी पाठीलाही डोळे फुटतात आणि त्यात काचांच्या फुटक्या  तुकड्यात जशी खूप  प्रतिबिंब लक्षात यावीत  तशी जिव्हाळ्या ची दिवंगत   माणसे दिसायला लागतात .. जीव एवढा एवढासा होतो ...

एखादा उदबत्तीचा वास   एखाद्या नव्या कोर्या छत्री वर पाडलेल पाणी ... ..मनाला मागे घेऊन जातं .. हरीतात्यांचा आवाज घुमायला लागतो ..

या देवा घराच्या माणसांनी आम्हाला खूप दिलं .. सदैव इतिहासाचे पंख लावलेला हा वेडा बागडा माणूस आम्हा एवढ्या एवढ्या हलक्या पोरांना  घेवून उडत उडत  जायचा ... खर खोट  देव जाणे पण क्षत्रिय कुलावतौंस वैगरे च दर्शन  घडवायचा

आमच्या चिमुकल्या जीवनाच्या हरळी च्या मुळ्या त्यांनी भूतकाळात जाऊन रुजवल्या... हरीतात्यांनी  कधी आम्हाला पैशाचा खाऊ दिला नाही ... पण प्रचंड अभिमान दिला ..

चिमुकल्या मनगटात कसल्या तरी जोमाच्या मनगट्या घातल्या .. त्या वेळी दिसल्या नाहीत त्याच्या त्या अदृष्य वळ्या  पण आज  एखाद्या आघाताच्या क्षणी दिसतात . दुर्दैवानी दरवेळी  मुठी वळाव्यात तश्या वळतातच असे नाही ... पण वेळी प्रसंगी  वाळू शकतील असा कुठेतरी आत्मविश्वास जो आत मध्ये  लपलेला आहे तो हरीतात्यांनी आम्हाला  न मागता दिला... 

------------------------------------------------------------------


१२ जून २००० रोजी आपले लाडके पुल देशपांडे पुढील प्रवासाला निघून गेले.

आज, हरितात्यांसारखेच पुल ही नाहीत .. पण ह्या  पुलदैवता चा पुलोत्सव मनात सदैव हरितात्यांच्या इतिहासा सारखाच जीवंत आहे !

२०११ साली "पुलकित" होऊन लिहिलेला छोटासा ब्लॉग -  "अंतु बर्व्याचे स्वगत"

=====================

आता पूर्वी सारखे पुणे उरलं नाही ...

पुण्या चा जाज्वल्य अभिमान असणारे ही आता चारलोकात बिचकून वागतात ... हमारे वक्त पूने में ऐसा नहीं था ..वैगरे वाक्य आपल्या मित्रात टाकुन बघतात ... पण त्या पुढे काही मजाल जात नाही

त्याला कारण ही तसेच आहे... ठेवलय काय आता इथे ... मुंग्यां सारखे लोक बे एरिया मधे गेले... तिकडे सदाशिव , नारायण , शनिवार पेठा वसव्ल्या.. बरोबरंच आहे .. पुढची पीढ़ी तरी सुखात नांदेल ... लोणी साखरेची चव पीनट बटर मधे शोधावी लागतेय एवढच दुख्ख

म्हणतात की आय टी नी पुण्याची प्रगति झाली .... कसली डोम्ब्ल्याची प्रगति ? नुसती गर्दी वाढली ... ती ही बाहेरची... पुण्यात आता मराठी बोलणारा हुड्कावा लागतो ... आपला असा एक म्हणाल तर शपथ ... परकेच जास्त ..

आय टी ने फ़क्त एकच केले ... पुण्याला पौडाच्या जवळ न्हेले !!!!

- अंतु बर्व्याचे स्वगत ( ८ नोव्ह २०११ )




Thursday, October 2, 2025

So Kul and So Kul take 2 ! सो कुल

 


In my exploration and reading Marathi women authors, I selected Sonali Kulkarni. I knew her as a sensitive and mature actress trained under Satyadev Dubey. Her books So Kul and So Kul take 2, are collections of her weekly articles/essays/diary pages, published earlier in Marathi Daily with some additional chapters that she has written for the book. 

I read these two books one after the other in piece-meal, reading 3-5 short essays in a week at leisure. SoKu's sensitivity is reflected in the books including her extreme left leaning along with fairly orthodox upbringing and cultural makeup. 

In evaluating the two books candidly, I found that the second book ( So Kul take 2) is written maturely. In reading the two books one after the other, one can easily spot transformation of a sensitive, dreamy and innocent girl into a sensitive , dreamy and mature women. Some of her writings are extremely touching. My biggest takeaways from her writings were some of the words in Marathi that I learnt, some forgotten words and phrases and some words or phrases that I had heard but had never read! I would recommend readers read both the books in order to understand the author (So Ku) better. So Kul take 2 is more readable than So Kul, So Kul needs to be perused at fast speed before starting So Kul take 2.

My biggest takeaway from So Ku's books were: 

I decided to read books of Dr Madhuri Vaidya, who in turn inspired me to read other authors like  Chin Tryam Khanolkar alias Aarti Prabhu , and Grace. These books definitely exposed me to the richness of Marathi literature ( that was limited to PuLa, VaPu etc in my earlier years). 

My liking for Marathi literature has brought me close to Moropant ( who I think is one of the greatest Marathi writers/poets born in last 500 year). More about him later as I explore his writings, Aarya and his life work. 

On a final thought, I realized that there can be left leaning, idealistic - socialistic people , who are not liberal , in fact quite orthodox culturally .. SoKu is a glaring example. 



Tuesday, November 16, 2021

Five books from my book shelf.. पाच मराठी ऑडीयो बुक्स

Recently I (re)read some books and their translations along with audio versions in Marathi. The theme of the five books that I read in a series revolved around Travelogues, Immigration and philosophy

Here is a list of the books: 

1) Old man and the sea - Ernest Hemingway : काय वाट्टेल ते होईल - पु ल देशपांडे 

2) Big City little boy - Manuel Komroff : मंतरलेले बेट - व्यंकटेश माडगूळकर 

3) The Alchemist - Paulo Coelho : द अलकेमिस्ट - डॉ  सुचिता नांदापूरकर फडके

4)   जावे त्यांच्या देशा - पु ल देशपांडे :  वाचन - प्रसाद ओक 

5)   अपूर्वाई - पु ल देशपांडे :  वाचन - अस्ताद काळे 

There is a general agreement that translated books are generally not as good as the original books. But there are always exceptions. Recently I came across at least three books that are translated into Marathi from English that I enjoyed more than the English versions that they were translated from. The Marathi audio version of these books keeps the reader (listener) more engrossed ! 

Old man and the sea - Ernest Hemingway : काय वाट्टेल ते होईल - पु ल देशपांडे 

Big City little boy - Manuel Komroff : मंतरलेले बेट - व्यंकटेश माडगूळकर 

The Alchemist - Paulo Coelho : द अलकेमिस्ट - डॉ  सुचिता नांदापूरकर फडके    

In the same series and theme of books I would like to recommend two audio books in Marathi. An audio versions (audio books) the classic books in Marathi by Pu La, Jave Tyancha Deshaa (जावे त्यांच्या देशा) and Apurvaai (अपूर्वाई ) were truly enjoyable ( read by Prasad Oak and Astaad Kale respectively ) 

जावे त्यांच्या देशा - पु ल देशपांडे :  वाचन - प्रसाद ओक 

अपूर्वाई - पु ल देशपांडे :  वाचन - अस्ताद काळे 

Saturday, July 25, 2020

मराठी चित्रपट - माझी Top Ten लिस्ट

 


चांगले, दर्जेदार मराठी चित्रपट पाहायचेत ?
माझी Top Ten लिस्ट :

१) देऊळ  : Mark Twain स्टाईल चा विनोद आणि sarcasm (उपरोध )

२) विहीर  : Nostalgic .. मी ह्या सिनेमाला "classic" दर्जा देईन
 

३) वळू : मराठीतल्या "मालगुडी" चा भास करून देणारी , पण original कलाकृती
 

४) हायवे : उच्च दर्जाची, जागतिक दर्जा ची कलाकृती .. कुलकर्णी द्वयी ची कमाल कलाकृती 

वरील चार ही सिनेमे अतिशय उत्तम आणि उच्च दर्जा चे आहेत .. गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी च्या प्रतिभे चे दर्शन घडवतात.. "हायवे" नंतर सतत रेंगाळत राहिलेली भा रा ताम्बेंची कविता :

"घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्‍न मना, बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं
का गुदमरशी आतच कुढुनी ?"




५) जिंदगी विराट : भाऊ कदम  आणि भूतकर नी कमाल केली आहे !

६) भोभो :
प्रशांत दामले एका वेगळ्या रोल मध्ये .. मनाला स्पर्श करून जाणारा 
 

७) ताऱ्यांच बेट : सचिन खेडेकर आणि लहान मुलानी कमाल ऍक्टिंग केली आहे .. कोकणातल्या सामान्य,सात्विक माणसाचं  चित्र .. Pure Innocence 

८) फँड्री : नागराज  मंजुळे चा आवडलेला चित्रपट .. किशोर कदम ची ऍक्टिंग .. कमाल !
 

९) मुळशी पॅट‍‌‌र्न  : भयानक वास्तविकता , पहावीशी वाटणारी "हिंसा"... आणि प्रवीण तरडे , भूतकर
 

१०) बोकड : ३० गाणी असलेला , संगीत नाटका सारखा गाण्यातून पुढे जाणारा सिनेमा

"पणन,पणन म्हणजे काय?
खाली डोके वरती पाय!
विक स्वतः ला विक मनाला
होऊदे रूटीन!"

"दिसतंय तसं नसतंय .. म्हनून जग फसतंय !"


११ ) सिंहासन : माझा मराठीतील सर्वात आवडता सिनेमा , अनेक वेळा पाहिला आहे .. अनेक वेळा पहावा असाच .. क्लासिक !

(जाता- जाता .... बघण्यात वेळ घालवू नये असे सरकारी निधी घेऊन बनवलेले दोन टुकार चित्रपट )
१) फर्जंद
२) उबुंटु

Saturday, June 27, 2020

जून चा महिमा .. नक्षत्रांचे देणे



जून महिना हा माझा आवडता महिना आहे.  त्याचं मुख्य कारण म्हणजे … फणस पिकायला खरी सुरवात होते ती जून महिन्यात येणार्या ज्येष्ठ मासात !  अजून एक कारण म्हणजे कोकणात “अंतू शेठ” बरोबर होणारी  वार्षिक भेट आणि होणार्या चर्चा … आप्तेष्ठांचे वार्षिक स्नेह संम्मेलन … नानू , नाथा , गजा , बबडू , परांजप्या, गोखले आणि हमखास भेटणारे चितळे मास्तर !



जून महिना मला तसा वर्षातला सर्वात महत्वाचा महिना हि वाटतो.. कारण वर्षा च्या मध्यावर , पूर्वार्धा कडे  मागे वळून हि पहाता येतं आणि उत्तरार्धा ची आखणी हि करता येते !

मराठी साहित्या च्या दृष्टी नी मात्र जून महिन्याला  एक कारुण्य आणि उदासीनते ची किनार आहे .. त्याचं कारण हि तसंच आहे.. अनेक  प्रसिद्ध मराठी साहित्यिकानी ह्या जून महिन्यातच जगाचा निरोप घेतला … अभिजात मराठी साहित्य आणि संगीतातील अनेक  नामवंतांची पुण्यतिथी ह्या जून महिन्यातंच !

जून १ १९३४ – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , नाटककार आणि विनोदी लेखक
.
जून १ १९९८ – गो.नी. दांडेकर , मराठी कादंबरीकार

जून ४  १९१८ – गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक

जून ५  १९८७ – ग. ह. खरे , भारतीय इतिहासतज्ञ.

जून ६  २००२ – शांता शेळके , मराठी कवियत्री.

जून ७  १९९२ – डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक

जून ११ १९५० – पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, स्वातंत्र्य सैनिक

जून १२, २००० – पु. ल. देशपांडे , मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार.

जून १३  १९६९ – प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक , पत्रकार, संपादक, राजकारणी, शिक्षणतज्ञ, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक व प्रभावी वक्ते.

जून १७  १८९५ – गोपाळ गणेश आगरकर , समाजसुधारक, विचारवंत.

जून २०  १९९७ – वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर

जून २६  २००१ – वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक  ( व पु )

अखेर जून महिन्यात संगित नाटक क्षेत्रातील एका उत्तुंग तारया ची जयंती हि आहे

 जून २६  .. बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस !


अभिजात मराठी साहित्याला एक अभूतपूर्व लोकप्रियता मिळवून देणार्या .. व पु , प्र के अत्रे , गदिमा आणि पु ल ह्या साहित्यिकांनी मला मराठी साहित्या ची गोडी लावली  ..  १२ जून हि पुलं ची पुण्यतिथी , म्हणून हि ब्लॉग पोस्ट आज टाकावीशी वाटली !
पुलं आणी पिलू .. अरे वेड्या मना तळमळसी .. 


जन्म आणि मृत्यू ह्या विषया वर चार ओळी...फसवणूक आणि हसवणूक
 “जन्म आणि मृत्यु ह्या दोन टोकांच्या मधे पकडून नियतीने चालवलेली आपणा सा‍र्‍यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्‍या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं? ”

– पु.ल  (प्रस्तावना : हसवणूक)



जन्म आणि मृत्यू ह्या विषया वर चार ओळी,  ज्या एक अमर गीत म्हणून आपल्याला माहित आहे ...आरती प्रभू, भास्कर चंदावरकर आणि रवींद्र साठे, यांनी या गीता ला अमरत्व दिलं आहे .. माझं  सर्वात आवडतं गाणं  ...

अंत झाला अस्ताआधी,
जन्म एक व्याधी, 
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी, त्याचा पडे बळी आधी,
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !



युट्यूब वर "कुणाच्या खांद्यावर" ची माझी प्लेलीस्ट 

खानोलकरां वर एकउत्कृष्ट वाचनीय लेख ( माधवी वैद्य )

कुणाच्या खाद्यावर ( गीता वरची माझी एक जुनी ब्लॉग पोस्ट ) 

Thursday, June 25, 2020

भारुड : शेण-आ-पती ची कथा



संत एकनाथांना आणि त्यांच्या प्रसिद्ध भारुडा ला स्मरून, गेल्या ६ महिन्यातील  महाराष्ट्रा च्या दयनीय स्थिती वर एक भारुड लिहिण्याचा प्रयत्न केला आहे ... चूक- भूल द्यावी घ्यावी

चाल ,स्वर्गीय राम कदम यांच्या स्मुतीस अर्पण ..त्याना  साष्टांग नमस्कार ..

चाल :  आली आली हो  भागा बाई ..आली आली हो  भागा बाई ..
भारुड : शेण - आ - पती ची कथा

शेणी कांच्या ह्या शेण-आ-पती ची काय सांगावी कथा 
फावड्या ला ह्या कोणी कोमटया म्हणतात 
कोणी जळक्या म्हणतात..
ह्या गद्दाराला कोणी लाचार हि म्हणतात
कोणी शेंबड्या - महापप्पू तर
कोणी बुजगावणं सु..द्धा म्हण ..तात

आली आली हो  भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..

मुंबई ची वाट लावून झाल्यावरी , निघाली शेणा महाराष्ट्राच्या पथ्यावरी 
बापाच्या पुण्याई वर , नरु-देवू च्या नावावर , मिळवली मतं गावभर 
लबाड लांडगा, हग्रलेखक हा, होता बांधलेला सिल्वर ओक च्या आत,
केला त्याने "खरया मालकाचा" घात
आणि आणिली ह्या "सम -पादकाने" कुत्र्यास लाज 
काका ला "भिजवला" भारी, दादा ला दिली तुरी ,
आणि गेला सोनिया च्या दारी ..
त्याने चाटायला सुरवात केली .. त्याने चाटायला सुरुवात केली 
त्याला लाज आणि इज्जत न्हाई , त्याला लाज आणि इज्जत बी न्हाई

आली आली हो  भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..

बशिवला झंप्या ला खुर्ची वरी , कोंडून ठेविला मातोश्री वरी
महाभकासिंनी नी घेतला कारभार हातात, करून चिरी - मिरी
घर कोंबडा हा ऐटीत, कोमट पाणी पीत बसून एसीत
भेंड्या आणि लुडो खेळीत,आराम करी सत्ता भोगीत
मामु खाई तुपाशी , शेणिक मरे उपाशी
शेतकऱ्यास  पाठविले , यम सदनासी

फेसबुक लाइव वर गप्पा भारी, बडबड करून थापा मारी ..
महाराष्ट्र राज्या ची परवाच न्हाई, देशाची बी परवाच न्हाई  

आली आली हो  भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..

काका चालविती सरकार, दादा ला दिला अर्थ व्यवहार
करून भोंगळ कारभार, संकट आणिले महाराष्ट्रावर
घोटाळया वर करी घोटाळे , करोना मात्र वाढे रोज शेकड्यांनवर
"खाद्य - मंत्री" भरती पैशांच्या नोटा, पेटया आणि पेट्या भर !
मुंबई हि आर्थिक राजधानी ,पछाडली कोरोनाग्रस्तां नी
सत्ताकारण करीत, वाट लाविली "महाभकास" वाल्यांनी ...
त्यांना जनते ची चिंताच न्हाई, खिसे भरून मलाई खाई  ..

आली आली हो  भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..

शेणिक झाले व्यथित, पण आता नाही त्यांना कोणी माय बाप
येण्शिपी - खान्ग्रेसी त्याना  हिणविती, घालिती  बुक्क्या आणि लाथ 
इज्जत गेली , सत्ता तर गेलीच गेली,
गद्दार शेण  -आ - पती पायी आयुष्य  "उध्वस्त" झाली
अहो ..सच्च्या  शेणीकां ची आयुष्य उध्वस्त झाली कि हो ...
त्यांना "बापा" ची आठवण आली , त्यांना "बापा" ची आठवण आली     

आली आली हो  भागा बाई ... आली आली हो भागा बाई 
तिच्या नवरया चा पत्याच न्हाई , तिच्या नवऱ्या चा पत्याच न्हाई ..








Sunday, November 17, 2013

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा !


डी एस के यांच्या कृपेने आज "गीतरामायण" हा श्रीधर फडके यांचा कार्यक्रम अनुभवण्याचा योग आला ! हा उत्तुंग आविष्कार आणी त्याच बरोबर धनश्री लेले या विदुषी चं निरुपण ऐकून धन्य झाल्या सारखं वाटलं !

गदिमा ह्या महा-कविराजा चे पाय धरायला मला ह्या आयुष्यात मिळाले नाहीत याची चणचण लागून गेली !
फक्त ह्या एका गाण्यातल्या पहिल्या आठ अंतर्यात गदिमांनी जीवनाची सर्व "फिलोसॉफी" सांगून टाकली आहे !
ह्या गाण्या बद्दल चा अजून एक आश्चर्यकारक किस्सा म्हणजे .. बाबुजींनी (सुधीर फडके ) ह्या गाण्याला चाल हि रेडियो वर "लाइव" गाता-गाता .. सकाळी ८.४० ते ९ च्या दरम्यान लावली !

गदिमा आणी सुधीर फडके या जोडीला साष्टांग नमस्कार ! 

श्रीरंग भावे  च्या स्वरात पराधीन आहे जगती


खुद्द बाबूजींच्या स्वरात .. पराधीन


श्रीधर फडके यांच्या स्वरात - पराधीन 



----------------------

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा  !

----------------------


दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?

वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ

पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा  !






Monday, November 11, 2013

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती


' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ' ह्या अभंगा ला दोन चालीत गायलं गेलं आहे .
लोकप्रिय चाल हि श्रीनिवास खळे यांची , लता मंगेशकर यांनी गायलेली ! पण हाच अभंग , अजून एका वारकरी चालीत गायलेला मला खूप आवडतो ..





जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया


चालो वाटे आम्ही तुझाची आधार
चालविसी भार सवे माझा


बोलो जाता बरळ करीसी ते नीट
नेली लाज, धीट केलो देवा


तुका म्हणे आता खेळतो कौतूके
जाले तुझे सुख अंतर्बाही

------

दुसरी चाल .. मला अधिक आवडणारी ! .. ह्या लिंक वर mp3 aahe !


http://plasamusic.mobi/detail/1/dUQzZXBrSkc/jethe-jato-download-play-listen-songs.html




Sunday, November 10, 2013

आज फिर जीने की तमन्ना हैं !


कल के अंधेरों से निकल के, देखा हैं आँखे मलते मलते
फूल ही फूल जिन्दगी बहार हैं,
तय कर लिया
आज फिर जीने की तमन्ना हैं

काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल
कोई ना रोको दिल की उड़ान को,
दिल वो चला
आज फिर ...

डर हैं सफ़र में कही खो ना जाऊ मैं,
रास्ता नया

आज फिर जीने की तमन्ना हैं

शैलेंद्र


Saturday, November 9, 2013

निवडक हरितात्या



हरितात्या आम्हाला शिवाजी, तानाजी , समर्थ ,तुकाराम वैगरे मंडळींना हे असे भेटवून आणायचे ...
वर्गातला इतिहास मला कधी आवडला नाही आणि कळला हि नाही ...त्यात सन होती .. हरीतात्यांचा  इतिहास सणांच्या गणितात गुंतला नव्हता .. तो हरीतात्यान   इतकाच जिवंत होता...
हरीतात्यांनी इतिहास हा भूतकाल वाचक क्रीयापादानी दूर न्हेलेला नव्हता .. असं वाटायच कि नुकतेच भेटून आलेत छत्रपतींना.. आज लक्ष्यात येतं ... त्यांचा त्या गोष्टीतला मी म्हणजेच ती इतिहास नावाची अज्ञात व्यक्ती !
प्रत्येक  प्रसंगी हरितात्या त्या तिथे कसे हजर  होते हा विचार लहानपणी आमच्या डोक्यात कधी  शिरला नाही आणि मोठे पणी आम्ही त्यांना त्या जागृत समाधी तून कधी बाहेर काढलं नाही


माझं बालपण इतिहास जमा झालं ... घरातली करती माणसं हि दृष्ट लागून जावी तशी गेली ....आजोबा आज्जी गेली ... वडील गेले .. घरचे नात्या गोत्यातले लोकही आता परके झाले आहेत ... हरीतात्या कुठे गेले कोण चौकशी करतोय ..
पण कधी कधी पाठीलाही डोळे फुटतात आणि त्यात काचांच्या फुटक्या  तुकड्यात जशी खूप  प्रतिबिंब लक्षात यावीत  तशी जिव्हाळ्या ची दिवंगत   माणसे दिसायला लागतात .. जीव एवढा एवढासा होतो ...
एखादा उदबत्तीचा वास   एखाद्या नव्या कोर्या छत्री वर पाडलेल पाणी ... ..मनाला मागे घेऊन जातं .. हरीतात्यांचा आवाज घुमायला लागतो ..
या देवा घराच्या माणसांनी आम्हाला खूप दिलं .. सदैव इतिहासाचे पंख लावलेला हा वेडा बागडा माणूस आम्हा एवढ्या एवढ्या हलक्या पोरांना  घेवून उडत उडत  जायचा ... खर खोट  देव जाणे पण क्षत्रिय कुलावतौंस वैगरे च दर्शन  घडवायचा

आमच्या चिमुकल्या जीवनाच्या हरळी च्या मुळ्या त्यांनी भूतकाळात जाऊन रुजवल्या... हरीतात्यांनी  कधी आम्हाला पैशाचा खाऊ दिला नाही ... पण प्रचंड अभिमान दिला ..
चिमुकल्या मनगटात कसल्या तरी जोमाच्या मनगट्या घातल्या .. त्या वेळी दिसल्या नाहीत त्याच्या त्या अदृष्य वळ्या  पण आज  एखाद्या आघाताच्या क्षणी दिसतात . दुर्दैवानी दरवेळी  मुठी वळाव्यात तश्या वळतातच असे नाही ... पण वेळी प्रसंगी  वाळू शकतील असा कुठेतरी आत्मविश्वास जो आत मध्ये  लपलेला आहे तो हरीतात्यांनी आम्हाला  न मागता दिला......  


निवडक अंतू बरवा



रत्नागिरीच्या त्या मधल्या आळी मध्ये लोकोत्तर पुरुष राहतात.  देवानी एक ...माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्या मध्ये रत्नागिरीच्या लाल चिर्याचे , नारळा फणसाचे , खाजर्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणार्या ओल्या  सुपारीचे गुण अगदी एकवटून भरलेत . 

अंतू बरवा हा ह्याच मातीत उगवला आणि पिकला.

जीवनाच्या कुठल्या तत्व ज्ञानाच्या अर्क हि मंडळी प्यायली आहेत .. देव  जाणे .. त्यातली निम्म्या हून अधिक माणसं मनी ओर्डर वर जगतात .. आणि त्यातले पैसे  वाचवून दावे लावतात..प्रत्येकाची तारीख पडलेली ..


विशाल सागर तीर आहे .. नारळीची बन आहेत  पोफळी च्या बागा आहेत ... सार काही आहे .... पण ...त्या  उदात्ततेला दारिद्र्य असं छेद देवून जांत आणि मग उरत काय ?   एक भयाण  विनोदाच  अभेद्य असं कवच !


कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील --- खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात !






निवडक रावसाहेब



एखाद्या माणसाची आणि आपली वेव्लेन्ग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये .. ह्याला काही उत्तर नाही. पंधरा- पंधरा वीस- वीस वर्षाच्या परिचयाची माणसं असतात .. पण शिष्टाचाराची घडी थोडीशी  मोडण्या    पलीकडे  त्यांचा आणि आपला कधी संबंधच जात नाही .. त्यांच्या घरी जाणं होतं , भेटणं बोलणं होतं , पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत.
आणि काही माणसं ... आगदी क्षणभरात जन्म जन्मांतरीच नातं  असल्या सारखा दुवाद साधून जातात... वागण्यातला बेत शुद्ध पणा अगदी क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही , पूर्व संस्कार , भाषा , चवी, आवडी निवडी .. कशाचाही आधार लागत नाही ... सुत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात !

बेळगावच्या कृष्णराव  हरिहरांची अशीच गाठ पडली .. त्यांना सर्व लोक रावसाहेब म्हणायचे ... 
हि रावसाहेबी त्याना सरकार नी बहाल केली नव्हती .. जन्माला येतानाच ते  ती घेवून आले होते .. शेवट पर्यंत ती सुटली नाही !     
काही माणसांची वागण्याची तर्हाच अशी असते कि त्यांच्या हाती मद्याचा पेला देखील फुलतो आणि काही माणसं दुध देखील ताडी प्यायल्या सारखे पितात ..
रावसाहेब शौकीन होते पण वखवखलेले नव्हते ..जीवानात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले .... पण उपाशी वाघ हा  काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्या च्या वळणावर न्हेईल ?





Monday, January 23, 2012

सन्तो करम कि गती न्यारी


उज्ज्वल बरन दिनी बगलन को  
कोयल कर दि काली
सन्तो 

मुरख को तुम राज दीयत हो 
पंडित फिरत भिकारी 
सन्तो 

औरन द्विपन जल निर्मल दिनी 
समुंदर करदिनी खारी
सन्तो 


मीरा 


Saturday, January 21, 2012

हात विणकर्याचे !



मुकी अंगडी बालपणाची , रंगीत वसने तारुण्याची 
जीर्ण शाल मग उरे शेवटी , लेणे वार्धक्याचे !

या वस्त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन 
कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकर्याचे !  
                    
 ग दि मा 



अजब  जुलाहा  चादर बिनी
सुत  करम  कि  तानी 
सुरती  निरति  कि  भारन    दिनी 
अब  सबके  मन  मानी

चादर  हो  गयी  बहुत  पुरानी 
अब  तो  सोच  समझ   अभिमानी



कबीर 


Monday, January 16, 2012

If you are going to follow the crowd....



                                            If you are going to follow the crowd , plan ahead !!



Sunday, January 8, 2012

In Celebration of being alive !

Early in my school days did I read a lesson in my English text book "In celebration of being alive". It was passage by Dr Christian Barnard, the celebrated heart transplant Surgeon, that struck chords in my heart. I had almost made a decision to be a doctor then, instantaneously.( in spite of my dislike for biology and extreme ease and friendliness with mathematics)
The lesson mentioned how the children with terminal cancers in Cape towns Children hospital were enjoying every moment of their remaining life, with knowledge of death at a striking distance. Their sheer ability to enjoy each remaining moment was inspirational to then depressed young Christian Barnard. The passage was extremely well written hinting how cribbing on small things in life need to be kept aside, each moment be enjoyed in CELEBRATION OF BEING ALIVE. 
I have tried to pursue this principle very diligently barring few exceptions !

On a side note:
I tried hard in those days in Pune to get the autobiography of Dr Christian Barnard  ( ONE :LIFE) for almost 10 years.. but could not get a copy of the book as it was out of print. Dr Barnard said to me , when I met him in 1998 that even he himself did not have a spare copy of the out of print biography ! 
The amazing fact is that I could buy the book for $1 in Amarillo , TX  at the "withdrawn book" sale of the Amarillo Public Library on one of the weekends in 1999 ! It is one of my priced possessions in all these years!!

I am now back at my place of birth completing that circle which took me all over the world to continue my celebration of being alive ! 

Thursday, January 5, 2012

का रे भुललासी वरलीया रंगा !

चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा
का रे भुललासी वरलीया रंगा


उस डोंगा परी रस नव्हे डोंगा
का रे भुललासी वरलीया रंगा !

तुझे तुज ध्यान कळो आले !

तुझा तूची देव , तुझा तूची भाव
फीटला संदेह अन्यतत्वी


अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळो आले

भक्ती मार्ग नीट !

शम दम कळा , विज्ञान - सज्ञान
परतोनी अज्ञान न ये घरा


समाधी साधन संजीवन नाम
शांती दया सम सर्वां  भूती


भक्ती मार्ग नीट हरी पंथी