Saturday, November 9, 2013

निवडक अंतू बरवा



रत्नागिरीच्या त्या मधल्या आळी मध्ये लोकोत्तर पुरुष राहतात.  देवानी एक ...माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्या मध्ये रत्नागिरीच्या लाल चिर्याचे , नारळा फणसाचे , खाजर्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणार्या ओल्या  सुपारीचे गुण अगदी एकवटून भरलेत . 

अंतू बरवा हा ह्याच मातीत उगवला आणि पिकला.

जीवनाच्या कुठल्या तत्व ज्ञानाच्या अर्क हि मंडळी प्यायली आहेत .. देव  जाणे .. त्यातली निम्म्या हून अधिक माणसं मनी ओर्डर वर जगतात .. आणि त्यातले पैसे  वाचवून दावे लावतात..प्रत्येकाची तारीख पडलेली ..


विशाल सागर तीर आहे .. नारळीची बन आहेत  पोफळी च्या बागा आहेत ... सार काही आहे .... पण ...त्या  उदात्ततेला दारिद्र्य असं छेद देवून जांत आणि मग उरत काय ?   एक भयाण  विनोदाच  अभेद्य असं कवच !


कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील --- खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात !






No comments: